Navratri wishes – मराठेशाहीतील नवदुर्गा
Navratri wishes – नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा उत्सव
7/10/2021
नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा उत्सव. जगातील कोणतीही शक्ती ,ही नेहमी अदृश्य आणि अव्यक्त असते, परंतु तिचा परिणाम हा दृश्य आणि व्यक्त असतो .नारी ही एक अशीच महाशक्ती आहे .व्यक्ती म्हणून ती दिसत असते पण शक्ती म्हणून ती अपरिचित असते.
राजे शहाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले यांना आपल्या पत्नी मध्ये महाशक्ती दिसून आली, आणि त्या शक्तीला पूरक वातावरण तयार करून त्या पद्धतीची वागणूक दिली म्हणून या स्त्रिया ऐतिहासिक महाशक्ती ठरल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सुना महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई यांना राजकारण आणि युद्धकला यांचे धडे शिकवले. आपल्या सासर्यांचे हे योगदान या दोघींनीही त्याग आणि शौर्य या रूपाने प्रकट करून आपण महाशक्ती आहोत हे सिद्ध करून दाखवले.
मराठेशाहीतील स्त्रियांचा राजकीय व प्रशासकीय सहभाग हा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून होता. पतिनिधनानंतर आणि शासनकर्ता पुत्र अल्पवयीन असल्यास त्याच्या नावाने राज्यकारभार पाहणाऱ्या अनेक स्त्रिया मराठेशाहीत होऊन गेल्या.
वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारी आजची स्त्री सामाजिक बदलांसाठीही ठामपणे उभी राहते आहे. म्हणूनच राजमाता जिजाऊमातेचा लोककल्याणकारी वारसा जपणारा जिजाऊंच्या लेकीचा गौरवशाली पराक्रमी इतिहास Navratri wishes आपणास समोर आणत मराठेशाहीतील नवदुर्गा स्त्रीशक्तीचा जागर मराठेशाहीतील गौरवशाली जाज्वल्य इतिहास निर्माण करणार्या आपल्या स्त्रीशक्तीच्या जोरावर अवघ्या शत्रूला नेस्तनाबूद करुन रयतेला आधार दिला.
मराठेशाहीतील स्रिया या कर्तुत्ववान असून त्यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष स्वरूपात आपला राजकीय व प्रशासकीय सहभाग नोंदवला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विशेषतः वैधव्यात त्यांनी आपल्या दौलतीचे संरक्षण केले. या स्त्रियांनी तत्कालीन राजकारणावर व प्रशासनावर आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवल्याचे दिसून येते. मराठे वारंवार लढाईसाठी जात त्यावेळी त्यांच्या जहागिरीचे उत्तम प्रकारे नियोजन या स्त्रिया करत. राज्यकारभार असो की ,न्यायनिवाडे असो या स्त्रिया ते कुशलपणे हाताळत होत्या. स्वराज्यातील स्त्रियांनी केवळ आपल्या जहागिरीचे संरक्षण व व्यवस्थापनच केले नाही तर त्यांच्या वाट्याला आलेल्या अष्टप्रधान मंडळातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ही यशस्वीपणे पार पाडल्या.
मराठेशाहीतील इतिहासात अनेक पराक्रमी सरदार घराणी पुढे आली. या घराण्यातून अनेक स्त्रियांचा सहभाग लक्षणीय वाढलेला दिसून येतो. सरदार घराण्यातील अनेक स्त्रिया अत्यंत त्वेषाने स्वराज्यात सत्तेसाठी संघर्ष करताना दिसून येतात. आपल्या जहागिरीचे या स्त्रियांनी प्राणपणानाला लावून संरक्षण केले.
मराठी स्वराज्यात स्त्रियांनी अत्यंत परिश्रमाने स्वराज्यासाठी सहकार्य केले.या स्रिया इतक्या शूर होत्या की त्यांना हरविणे पुरुषांना देखील अशक्य वाटत होते. म्हणून या पुरुषांनी या स्त्रियांच्या विरोधात कूटनीतीचा अवलंब केला. तरी या स्त्रिया न डगमगता आपल्या हयातीत आपल्या मुलाबाळांच्या हक्काचे अधिकाराचे रक्षण करत.
या काळातील बऱ्याचशा स्त्रिया केवळ कर्तव्य म्हणून राजकारणात उतरल्या. त्यांच्या इच्छा – अनिच्छेचा त्यात प्रश्नच नव्हता. घराण्याची दौलत सांभाळणे हे त्यांचे परम कर्तव्य होते. काही स्त्रिया अतिशय महत्त्वकांक्षी होत्या. काहींनी आपल्या जहागिरीत आपला स्वतंत्र ठसा व अस्तित्व निर्माण केले.
थोडक्यात महाराष्ट्रात जसे वीरपुरुष निर्माण झाले तसेच वीर – स्त्रियाही निर्माण झाल्या. एकंदरीत मराठाकालीन स्त्रियांना राजकारण व प्रशासन यात मिळालेले स्थान व अधिकार पाहता तत्कालीन समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत होता असे लक्षात येते.
अशा या अनेक शौर्यशाली ‘शोध मराठेशाहीतील नवदुर्गाचा’ सदराखाली इतिहास संशोधक व लेखक डाॅ. सुवर्णाताई निंबाळकर यांच्या लेखणीतून Navratri wishes व्यक्त होणार आहे. ही जणू आजच्या नवदुर्गांना पर्वणी होय.
Also Visit : https://www.postboxlive.com
#जागरमराठेशाहीचाजागर_स्त्रीशक्तीचा
The post Navratri wishes – मराठेशाहीतील नवदुर्गा appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India – Anytime Everything